लोडशेडिंगने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पर्यायी ऊजेर्कडे वळण्याची आवश्यकता असूनही याबाबत अद्याप फारशी जागृती दिसत नाही. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थोपवण्याची किती गरज आहे, हे अनेक पर्यावरणप्रेमी कोकलून कोकलून सांगत आहेत, त्याला कित्येक वर्षं लोटली. आता त्याबद्दल बऱ्याच अंशी अनेकांमध्ये जागरुकताही आली आहे, पण...? कळतं पण वळत नाही, अशी आपली नेहमीच अवस्था असते. या कोकलून कोकलून सांगण्याला केवळ भावनावेगाचं कारण असू शकत नाही. कोणतीही गोष्ट करू नका, असं लोकांना सांगायचं, तर त्यांना त्याच्याऐवजी ठोस पर्याय द्यावा लागतो, आणि हे काम "सोलार उर्जा" ने आपल्या हाती घेतलेले आहे |